Tuesday 26 January 2010

दारू

दारू

शनिवारी रात्री मित्रांबरोबर बसलो मी प्यायला
क्वार्टर नंतर हळू हळू दारू लागली बोलायला,
म्हणाली आजकाल मिळत नाहीत लोक मला न्याय द्यायला
प्रेमभंग झालेले वीरच, बसतात कधीतरी लावायला.

म्हणतात लोक झेपत नसेल, तर दारू नाही प्यायची
अहो न झेपल्यानंतरची मजा त्यांना काय कळायची,
पिऊन स्वतःची आणि इतरांची मजा पहायची
जिवलग मित्राला सुद्धा खटकन कानाखाली हाणायची.

माणूस होतो हरिश्चंद्राचा अवतार बोलू लागतो खरं
कधी आसू, कधी हासू, पण मनातून निघतं सारं
प्रेम नोकरी शिक्षण धंदा, कटकटी जातात पटकन दूर
त्या दारूत क्षणभर आपण विसतो, आपल्या स्वप्नाचा चक्काचूर

नंतर दारू तिची गाह्राणी लागली मला सांगायला
तिला समाज वाईट म्हणतो, हे पटला नव्हतं तिला
उरलेले २ पेग मी दिले तिला मारायला
ते मारून तिचं दुःख, लागली ती विसरायला.

प्रसन्न
१०/०८/२००७

2 comments:

  1. प्रेमभंग झालेले वीरच? खरं की काय?

    ReplyDelete
  2. mala experience nasalyane tula kahich sangu shakat nahi hya kavite baddal !!!

    ReplyDelete